Dearness Allowance : गणपती विसर्जनानंतर आता पुणेकरांसह सर्वांना दसरा आणि दिवाळी या सणांची ओढ लागली आहे. सणासुदीचे दिवस म्हटले की, बाजारपेठा विविध वस्तूंनी फुललेल्या असतात आणि खिसेही बोनसनं भरलेले असतात. अशा उत्साहाच्या वातावरणात, यंदा केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा होणार आहे सुमारे १.२ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.
महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ अपेक्षितः केंद्र सरकार महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance DA) जवळपास ३ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा दिवाळीच्या तोंडावर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे लवकरच येतंय.
पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार?
केंद्रीय कर्मचारीः
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याची मूळ पगार (Basic Salary) ५० हजार रुपये असेल, तर जुन्या ५५ टक्के महागाई भत्त्यानुसार त्याला २७हजार ५०० रुपये भत्ता मिळत होता.
वाढीव महागाई भत्ता कधीपासून लागू होणार?
केंद्र सरकारने जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली, तर हा भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, नव्या दरानं महागाई भत्ता जुलै २०२५ पासून लागू होईल.
यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा अरियर्स (Arrears) मिळेल. हा अरियर्स ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळण्याची शक्यता आहे, असे फायनांशियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
महागाई भत्त्याची कॅलक्युलेशन पद्धतः सातवा वेतन आयोग महागाई भत्ता ठरवण्यासाठी कंझ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स (CPI-IW) चा वापर करतो. या फॉर्म्युल्यानुसार, CPI-IW डाटाच्या १२ महिन्यांची सरासरी काढली जाते. जुलै २०२४ ते जून २०२५ मध्ये CPI-IW ची सरासरी १४३.६ इतकी आली होती. त्यानुसार महागाई भत्ता हा ५८ टक्के इतका होतो. याच अर्थ यंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता आणि आठव्या वेतन आयोगाची स्थितीः विशेष म्हणजे, हा सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता असेल. कारण सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त होत आहे. सरकारने जानेवारी २०२५ मध्येच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. मात्र, अजून त्याचा टीओआर (टर्म्स ऑफ रेफरन्स) निश्चित झालेले नाहीत, आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही २०२७ च्या शेवटी किंवा २०२८ च्या सुरुवातीला होऊ शकते.
पुण्यासह महाराष्ट्रातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आर्थिक दिलासा देणारी बातमी आहे, ज्यामुळे सणासुदीच्या दिवसांत त्यांच्या हातात अधिक पैसा पाणी येईल.
नव्या ५८ टक्के महागाई भत्त्यानुसार त्याला आता हाच भत्ता २९ हजार रुपये इतका मिळेल. याचा अर्थ कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये (₹१५००) जास्त मिळणार आहेत होय.
पेन्शनधारक :
जर एखाद्या माजी कर्मचाऱ्याची मूळ पेन्शन ३० हजार रुपये असेल, तर त्याला नव्या ५८ टक्के दराने १७ हजार ४०० रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजे प्रत्येक महिन्याला ९०० रुपये जास्त मिळतील.
ही ढोबळ आकडेवारी आहे. प्रत्येकाला मिळणारा फायदा हा त्याच्या पगार आणि पेन्शनवर आधारित असेल.
